Follow me

Wednesday, October 6, 2021

संशय आणि बरच काही

Hii...frds...आज जरा लेख लोहतोय संशय वर संशय) हा विषय नाव प्रमाणेच खूप गंभीर आहे. काही लोक खूप संशयी असतात,तर काहींना संशय घेतला तर खूप राग येतो. आपल्या वर कोणी संशय घेतला की खूप राग येतो कारण आपण तसे नसतो,आणि तशी गोष्ट केलेली नसते,मग अस का होत.आणि वैवाहिक जीवनात तर या गोष्टी खूप घडतात..so. संशय ही अशी गोष्ट आहे ती मनातून तयार होते. कारण एखाद्या व्यक्ती वर आपला खूप जीव असेल प्रेम असेल तर आपणास भीती असते की ही माझी आहे,दुसऱ्याची तर नाही होणार ना,आणि तीच ,त्याच ,प्रेम कमी नाही होणार ना. ही व्यक्ती आपल्या पासून दूर नाही जाणार ना..हे अशे प्रश्न सारखे सतावतात.आणि मग यातून संशय ही भावना तयार होते.मग ते कोणते ही जीवन असो,मैत्री चे ,वैवाहिक,इतर.. सर्वच म्हणतात की संशय वाईट आहे...आणि तो घेतला नाही पाहिजे.हो ते ही आहेच....पण आपण असे वागलो ते की संशय घ्यायलाच जगा ठेवली नाही तर.चांगल होईल ना.. आणि एक गोष्ट ही खरी आहे जो जास्त प्रेम करतो तोच जास्त संशय घेतो.ok पण हे ही खर आहे की खर प्रेम असेल तर संशय याला जगा राहत नाही. जर आपल्या चालू आयुष्यात जर दोघांमध्ये संशयाचे भूत वावरत असेल तर की करायचं? नीट ऐका...या भुताला जर पळून लावायचे असेल तर दोघात मनमोकळे पणाने संवाद झाला पाहिजे अगदी सगळे डाऊट क्लिअर झाले पाहिजेत..चर्चा केली पाहिजे..समजा नवरा बोलत असेल की काय ग तू जास्त फोन वर असते कीव जास्त कोणाशी बोलते...अशा वेळी तुम्ही तिथे सर्व सांगून संवाद साधून राहिले पाहिजे.. काही वेळेला अस ही होत की महिला जॉब करतात दिवसभर तिकडे असतात आणि मग काही वेळेस नवऱ्याची घालमेल होते. So तुम्ही बसले पाहिजे मोकळा वेळ असला की आणि मनमोकळा संवाद साधला पाहिजे की तुमच्या शिवाय न कोणी आहे न कोणी नसणार...शेवट पर्यंत.अस त्यांना रोज सांगत जा.आणि त्या प्रमाणे वागत ही जा.डाऊट क्लिअर झाले की संशय पळून जातो हे लक्षात ठेवा. आता काही लोक अपवाद असतात..की सगळे संशय खरे ठरतात आणि त्या गोष्टी सगळ्या तशाच असतात..या वर आपण काय करणार. आणि जर चुकून जर तशी चूक तुमच्या कडून झालीच असेल तर मनातून माफी मागा.आणि ते तिथेच stop करा.हो मग माफी..कारण तो,ती तुमचे जीवन साथी असतात..जीवन भराचे..माफ ही करू शकतात...कारण खूप प्रेम असते. एक उदाहरण सांगावे वाटते...नीट ऐका आणि यातून बोध घ्या. एक विवाहित जोडपे..लग्नाला 5 वर्ष झाली होती सगळ चांगल चालले होते,1 मुल झाले. नवऱ्याच खूप प्रेम होत.आणि तीच ही... पण आजू बाजूचे लोक असे काही वागतात की या दोघां मधे जरा संशयाचे भूत तयार होते.नवरा सतत बोलत असे की,तू का त्याच्याशी बोली,तू का हसली,तुझ मला नाही पटत..अस वगेरे.. आणि ती बायको ही त्याला रोज सांगत की नाही ओ अस काही तुम्ही उगाच नका ताप देऊ plz. अस आता रोजच चालू होत..आणि जरा भांडणे ही होऊ लागली..याचा रोज संशय,आणि ती रोज सांगायची..अहो नाही अस काही.... एक दिवस खूप भांडणे झाली आणि तो कामाला गेला ,हिला आता खूप मनस्ताप झाला होता.ती वैतागली होती.आपला जीवन साथी जर समजून घेत नसेल तर की फायदा अशा संसाराचा.. तिने पोरांना व देवाला हात जोडले.आणि आपल्या साडीचा फास तयार केला आणि फॅन ला लावला आणि उडी घेतली अगदी कायम ची.. हा चार वाजता घरी आला . सर्व बघून खूप थक्क झाला खूप रडू लागला...त्याला पाचाताप झाला. आणि आता पोरगा आणि तो पोरका झाला. या वरून काय कळते हो? म्हणून मी सांगतोय.. आता हे बोलले नाही पाहिजे अस एवढं dip पण 1 लेखक म्हणून बोलावे वाटते..अशा गोष्टी जर संसारात घडत असतील तर तुमचा जो प्रेम करायचा ,रोमान्स करायचं वेळ असतो किंवा मूड असतो तेव्हा अशा सगळ्या गोष्टी मनमोकळे पणाने बोला सांगा...की तुम्हाला जे वाटते ts अजिबात नाही...ते त्यांना पटवून द्या. अस केलं तरच अशा गोष्टींना आळा बसेल.आणि संसार सुखाचा होईल.. आणि मन मारणे पण शिकले पाहिजे,ते ही खूप गरजेचे आहे,मन मारणे म्हंजे काय आता तर काही वेळेस अस होत की मुल मोठी होऊ लागतात...आणि मग प्रेम रोमान्स थोड कमी होवून जाते किंवा वेळ आणि जगा भेटत नाही. आणि अस ही की mr च age प्रमाणे ते आता हवा tsa इच्छा पूर्ण नाही करत तर असूद्या..जे असेल tas चालून घ्या मन मारा..ते सुख दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्नही करू नका. आणि जवणीत तुम्ही नवीन असताना ते सुख भरपूर घेतले असते...म्हणून वेळ पडली तर मन मारा ....मग संशयाला जगा रहात नाही. धन्यवाद.. काही चूक झाल्यास मुलगा म्हणून माप करा. कारण मी लेखणी तून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत आहे....

4 comments:

  1. ज्वलंत लेखन 👌🏻👌🏻👏👏👏👏

    ReplyDelete
  2. 👌👌👌👌 अगदी मार्मिक लिखाण केले आहे.

    ReplyDelete
  3. सुंदर लेख....🍫🍫🍫🍫🍫👌👍✍️

    ReplyDelete
  4. सुंदर लेखन ✍️👌👌👌

    ReplyDelete

SurajM1-तुमचे स्वागत करत आहे. Comments plz.

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...