kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Sunday, October 31, 2021
खोटी मैत्रीण
होतीस मैत्रीण जिवाभावाची,
पण तुला किंमत नाही माझी,
नुसते खोटं साँग करते,
झाली जीवाची लाही
Thursday, October 28, 2021
अशी एखादी मैत्रीण असावी,
अशी एखादी मैत्रीण असावी,
ती कायम सोबत रहावी,
मैत्री ही निर्मळ असावी,
कधी नाराज असलो तरी,
धीर देणारी असावी,
ती मनाने निर्मळ असावी,
कधी मागे पडलो तरी,
सोबत घेवून पुढे नेणारी असावी,
एकटे वाटेत सोडणारी नसावी,
अस हक्काने सांगणारी असावी,
मी आहे काळजी करू नको कशाची,
तुला साथ देईन कायमची,
ती हळूच गाली हसणारी असावी,
गोड मधुर बोलणारी असावी,
ती खांद्यावर हात ठेवणारी असावी.
Wednesday, October 20, 2021
ताई साहेब...अभिनंदन
ताई चे खूप खूप शुभेच्छा अभिनंदन मनापासून..🌺🌺🌺💗💗💗💗🌿🌿🌿🌹🌹🌹🌿🌹💖काव्य सम्राज्ञी असा मान मिळवलेल्या,आणि लिपी वर सर्वात मानाचे स्थान असलेल्या माझ्या ताई...त्या आज सामाजिक आणि स्त्री विशेष या श्रेणीत टॉप 1 आहे त्या बद्दल त्यांचं कौतुक नापासून अभिनंदन...
त्या नेहमी टॉप 1 te 3 मधे असतात..आणि त्यांची लेखणी ही तशीच असते ,अगदी तडपदर.
मी ही टॉप 10 मधे नेहमी असतो.तेफक्त ताई न मुळे..लिपी वर नवीन होतो लिखाण जमत ही न्हवते कसले,तेव्हा मला त्या भेटल्या ताई या स्वरू पात.आणि त्यांनी सर्व शिकवून सांगून मी आज तिथे आहे.खरच ही माऊली आणि त्यांची कृपा खूप धन्य आहे.मन खूप मोठं आहे ,आणि तेवढच साफ आणि सुंदर.लिपी वर तरी त्या व्यक्ती सारखे कोणी होणे नाही...धन्यवाद..
अशा आहेत माझ्या ताई ....खूप खूप शुभेच्छा अभिनंदन...💗💗🌹🌿🌹🌹🌺🌺🌺💞💞💘💘💘💝🌿🌿🌿🌿🌹🌹💗💗🙏
Monday, October 18, 2021
आठवणीतील खिडकी.
मला अजून हो आठवते ती किडकी.ज्या खिडकी मधे ती येऊन बसायची.मला इशारा करायची.
हो .8 दहा वर्ष पूर्वी ची आठवण आज जागी झाली. होती अशीच एक खिडकी मला ती त्या खिडकीत दिसायची...रोज दिसायची..हसायची.
मी तर वेडा झालो होतो तिच्या प्रेमात...
आमच्या घरापासून एक शेजारचे घर होते ,तिथे उभा राहिलो की ती खिडकी दिसायची.
आणि ते घर माझ्या चुलत बहिणीचे...ती ही एकदम फ्री होती...मग मी त्या खिडकीची झलक पाहण्या साठी सारखं तिकडे असायचो.ती मुलगी ही कधी खिडकीत आली की वेगळा आवाज कडून किंवा गाणे म्हणून मला इशारा करायची
मी खूप खूष होऊन जायचो.मी सकाळ झाली की त्या जागेवर जायचो,दुपारी ही 2 वेळा चक्कर मारायची.आणि रात्री जेवण ते झोपे पर्यंत तिकडे चक्कर असायची...ओळख ही झाली होती..
आधीच फक्त हे हलके फुलके प्रेम जे म्हणतात ना फॅन्ड्री सारखं तसे होते आमचे..
ती खूप हुशार होती शाळेत...आणि आम्ही जेमतेम जरा बरे,मग यात्रेत तिचा पाठलाग करून भेटणे ,ते लाजून बोलणे...वगेरे.. पण प्रपोज करायची हिम्मत होतच न्हवती तेव्हा.खूप भीती होती.तिची ही आणि घरच्या लोकांची ही.
2 वर्ष असच फॅन्ड्री सारखं प्रेम केलं.मग माझी 12 वी झाली नॉर्मल पास...😀😂 आणि next year नंतर तिची 12 वी झाली ती 2 नंबर नी पास घरच्या लोकांनी तिला ing ला पॉलिटेक्निक ला टाकले...मी मनात ठाम केले आणि ठरवले.तिला प्रपोज करायचा.दिवस ठरला ती अशीच खिडकीत आली ,मी इशारा केला की मोगरा गुलाब झाडा जवळ ये .थोड बोलायचं आहे. ती फुले तोडीच्या बहाण्याने आली..
मी तिकडे गेलो आणि बोललो..अश्विनी मला तुला 1 सांगायचं आहे..माझे हात थर थर करत होते
छाती धड धड करत होती..भीती मनात खूप होती.शेवटी धाडसाने बोललो.. आशू..मला तुला प्रपोज करायचंय आहे..आवडतेस yr...love you....
दुसरे काय होणार माझे नशीबच...फाटके ...
ती शांत पने म्हणाली सुरज ठीक आहे आवडते मी लाईक करतोस ,प्रेम करतोस..पण मी तुला त्या ठिकाणी नाही पाहत..चांगला frd आहेस आणि राहशील..आणि आपण खूप जवळ राहतो 1 समाजात राहतो..आपले घरचे रिलेशन पण खूप मस्त आहे..so आपले प्रेम नाही सक्सेस होणार sorry..उद्या मी मोठी इंजिनीयर होईन..माझ्या घरचे माझ्या वरचड नवरा बघून लग्न करतील.
तू ही खूप शिक प्रगती कर मला विसरून जा,
पण मैत्री विसरू नको.stil frdship mi..
तिने एवढे बोलल्यावर मी जरा नाराज झालो आणि तिला stil frdship च उत्तर न देता तेथून निघून गेलो...तिथेच माझ्या पहिल्या प्रेमाचा शेवट झाला.
आज त्या गोष्टी ला 6 वर्ष झाली.ती ही चांगल्या जॉब ला आहे...आता ती गावी नसते शहरात असते..खूप प्रगती करते..
आणि मी ही खूप खुश आहे मी ही जॉब करतो,लेखन,वाचन,उद्या मोठा लेखक डायरेक्टर होईन...
जर नशिबाने साथ दिली तर माझा ऑटोग्राफ साठी उद्या ती ही लाईन मधे असेल ....
So अस होत माझं fast love...आणि ती खिडकी...आता ते घर त्यांनी मोडले आणि.
दुसरे बांधले आता ती खिडकी आणि तिची जागा नाही शी झाली....
हो ती माझी तशीच आहे..
हो ती माझी तशीच आहे..
त्या नाजुक गुलाबसारखी आहे..
म्हणूनच माझी ती तशीच आहे..
मैत्री ही ती निभावत आहे..
घर संसार ही चालवत आहे..
माझी ती तशीच आहे..
वाऱ्या सारखी येते...
न चुकता लाईक कमेंट करून जाते..
ती खूप ग्रेट आहे..
माझी ती तशीच आहे..
सर्व सावरते...
सगळ समजून सांगते..
निर्मळ मनाची आहे..
माझी ती तशीच आहे..
मला तिचा अभिमान आहे..
की ती माझी दोस्त आहे..
ती खूप नाजूक आहे..
हो..माझी ती तशीच आहे...
Sunday, October 17, 2021
माझ्या फ्रेंड नी केलेली कविता.
माझी सर्वात खास आणि बेस्ट फ्रेंड तिने माझ्यावर केलेली ही सुंदर कविता...
🌹थोडासा हट्टी थोडा खोडकर
तरीही मैत्री टिकवतो...
खूप बडबड केली म्हणून
ओरडल जरी तरी प्रत्येक
वेळी समजून तो घेतो...
कधी अबोला धरून तर कधी नाराज होऊन...परत मनवायला मलाच तो येतो....
आहे असा एक मित्र जो खरी मैत्री जपतो....
🌹🌹🌺🌿🌿
Saturday, October 16, 2021
आई तू असायला हवी होती
सार जग नावजतय..
आई तू असायला हवी होती..
खूप प्रगती करतोय...
तू बघायला हवी होती..
बाबा...वडील
कसं जमत रे तुला
वेदने शी झुंजयाला..
परिवाराचा भार पेलायला..
वेगवेगळी तडजोड करायला..
कसं जमत रे बाबा तुला...
आपल कुटुंब सावराया..
Friday, October 15, 2021
खोटं प्रेम
लोकं अशी का करतात,
खोटी आशा दाखवतात,
खोटं प्रेम करून,
मनाला घाव देतात,
मन तोडतात ,
अवचित निघून जातात,
यांना कस जमतं,
खोटं प्रेम करायला,
काटा येतो अंगाला,
हेच येत माझ्या नशिबाला,
असुदे नाही फरक पडत,
हे दिसतय देवाला,
मी माप करेन ही,
तो वरचा माफ करणार नाही,
अंधार व्यसनाचा..
अंधार व्यसनाचा...ही कथा एका विवाहित 35 वर्षीय तरुणाची आहे...मासाच्या आयुष्यात व्यसन हे किती घातक असते,आणि त्या मुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
व्यसन हे आयुष्याचा अंधार करून जाते.आणि हा अंधार एवढा भयानक असतो की पुन्हा उजेड होण्याची शक्यता फार कमी असते..दारू मुले जे नुकसान होत त्याचा पाचातप हा होतोच आणि भोगावाच लागतो..आणि तुमच्या वाईट कर्मा मुळे , वाईट व्यासना मुले तुमच्यावर जे भोग येतात...त्या मधे कोणीच साथ देत नाही.
* अंधार...व्यसनाचा..*
मीना बाहेर ओट्यावर भांडी घासत होती.
दोन्ही मुले शाळेत गेली होती.मोठी मुलगी गौरी,आणि लहान मुलगा गणू. गौरी ५वी मधे तर गणू ३ री मधे होता...
मीना बाहेर भांडी घासत होती,तेवढ्यात तिचा नवरा नाऱ्या खूप दारू पिऊन आला..व तो मीना ला नको त्या शिव्या देऊ लागला..
नाऱ्या= ये...मिने..ते कालच भांगलनी च पैका कुट हाय.. सांग लवकर..
मीना= अहो , तुम्ही आज पण पिऊन आला,किती यला सांगितलं...पिऊ नका,घरात लक्ष द्या लहान पोरं हायती आपली..पैका बैका काय न्हाय...
( नारू आणि मीना मधे जोरदार वाद होतो.आणि नारू मीना ला मारझोड करून पैसे घेऊन जातो.
व दोन्ही मुले शाळेतून घरी येतात.)
मुलगी गौरी= आय...आय..मला बाई नी नवीन धडा शिकवला...आय..तू रडती का ग? काय झालं..हाताला लागले का तूझ्या?...आय..बोल की ग..का रडती.
गणू= आय...तू का रडती ग...काय झालं रडू नको...मला पण रडू येतं..
मीना= आर...पोरांनो....काय न्हाय झालं... माझं डोकं लय दुखतय...म्हण..पाणी येतंय डोळ्यातून.
तुम्ही जेऊन घ्या...
( रात्री पुन्हा नाऱ्या...घरी येतो..व जेवण करून..शिवीगाळ करून झोपण्यास जातो)
मीना= अहो.. काल पसन माझ्या छातीत अन् पोटात दुखतय...उद्या जाऊया सरकारी दवाखान्यात...लय तरास व्हतूया..
नाऱ्या= ये...गप पड.पोटात दुखतय..न्हाई लगीच मरत...
( त्या रात्री मीनाला खूप त्रास झाला, पण तिने तो अंगावर काढला..उद्या दवाखान्यात जायचं या आशेवर.)
( दुसऱ्या दिवशी मुले शाळेत जातात.अन् मीना नाऱ्या ला चला दवाखान्यात जायचं असे सांगते)
मीना= अहो..चला की लय तरास होतय..
नाऱ्या= ये...दवाखाना नंतर...मला 100 रू दे आदी...दे लवकर न्हाय तर कानसुल फुडीन.
मीना= आव अस का करतात ...मी ते पैस पोरांच्या शाळ साठी अन् मला दवाखाना साठी ठेवल्यात...म्या न्हाई देणार..
( नाऱ्या पुन्हा जाऊ दवाखान्यात पण मला आता पैसे दे अस सांगत मीना ला शिवीगाळ करतो.आणि पैसे घेऊन बाहेर जातो.)
( मीना चा जीव मुलांसाठी खूप तुटत असतो.नशिबी नवरा असला,मला ही बिमारी,मुलांचं कसं होणार..या चिंतेत ती असायची)
( रात्री नाऱ्या पुन्हा पिऊन घरी येतो.)
मीना= आव..काय म्हणायचं तुम्हाला..सगळ्या पशाची दारू पिऊन आला..मला लय तरास होतय...मला काय बी करून उद्या दवाखान्यात न्या...
नाऱ्या= य बाई...झोप तू उद्या बघायला इल...मरत न्हैस लगिच..पैस संपल्याती...म्या समद उडवल...झोप गप.
( दोघा मधे पुन्हा वाद मारझोड होते.मुल घाबरतात)
गौरी मुलगी= बाबा आय ला का मारताय...मारू नका...( रडू लागते)
गणू= बाबा मारू नका आई ला...( जोराने रडत आई पाशी जाऊन तिच्या मांडीवर झोपतो)
( मीना ही सर्व यातना,लागलेला मार सहन करून झोपी जाते.)
दुसऱ्या( दिवशी सकाळी)
दोन्ही( मुले शाळेत जातात..आणि नारू आता नीट शुध्दीवर असतो..तो गावातील लोकांकडे पैसे मागायला जातो..तसा तो जे काम करेल तो पैसा तो दारू जुगार मधे उडवायचा..आणि आता तो लोकांकडे उदार पैसे मागण्यासाठी जातो..)
हिकडं( घरात मीना वेदनेने व्याकूळ..आपल्या मुलांची अन् नवऱ्याची वाट बघत बसते.)
( मुले शाळेतून घरी येताना त्यांचा संवाद)
गणू= ये...दिदे...बाबा आई ला रोज का मरतो ग..
आई लय रडती...मला बी लय रडायला येत मग...
( गणू रडू लागतो)
गौरी= गणू रडू नको,न्हाई मारत बाबा...ही समद दारू मूळ होतय...तू रडू नको...चल लवकर घरी...आपल्याला..आई ला दवाखान्यात न्याच हाय...बाबा न्हेत नाय ना आई ला दवाखान्यात चल आपण न्हेऊ तिला.
( दोन्ही मुले घरा पाशी पोचतात..घराचा दरवाजा अलगद उघडतात...)
( सगळ दृश्य पाहून गौरी जोराने किंचालते, हंबरडा फोडते..)
( ते दृश्य होत...मीना चीली पाशी...नीचीप पडलेली असते...अगदी कायमची...( Deth)
( काही वेळाने नारू हताश चेऱ्याने घरी येतो..त्याला पैसे कोणीच दिले न्हवते...त्याला ही काही सुचत नव्हते आणि तो घरी येतो...आणि त्याला...एक दृश्य दिसते...)
( मीना शांत चुली पाशी पडलेली...आणि ती दोन्ही मुलं...आकांताने...किंचाळत..हंबरडा फोडत...आई पाशी...बसलेली असतात.)
नाऱ्या ला आता कळून चुकले आपण खूप मोठी चूक केली...आपल्या व्यासणा मुळ आपल्या जीवनाचा ,आपल्या संसाराचा अंधार झाला.
तो ही डोके आपटून रडू लागतो...त्याला पाचातप होतो... . समाप्त.
धन्यवाद..
टिपः... सदर कथा काल्पनिक असून असणाऱ्या पात्रा शी,घटने शी,नावाशी,कोणाचा काही संबंध नाही...असल्यास योगायोग समजावा..
चिंब पावसात
हेच तुझ निर्मळ वागणं,
आवडते ग मला,
तुझा हात हाती घेऊन,
चिंब पावसात भिजायला,
खरच आवडते मला.
🌹🌹🌺🌺🌺🌿❤️❤️❤️❤️
Wednesday, October 13, 2021
भेटणे शक्य नाही..
जीव आहे तुझ्यावर,
पण भेटणे शक्य नाही,
होते मनाची लाही लाही,
वाटत तुला द्यावा आनंद,
त्या कल्पनेच्या दुनियेत,
रमून जावे वाटते तुझ्या छायेत,
जरी लांब असलो तरी,
कायम राहील हृदयात,
तुझी आठवण राहील मनात,
तुझ्या मॅसेज चा बोलण्याचा,
सहवास भारी वाटतो,
मनाला आनंद देतो.
तू आहेस निर्मळ
तू आहेस निर्मळ,
तू आहेस कोमल,
तू आहेस चंचल,
तू आहेस निरागस,
तुला पाहताना होते,
माझ्या मनाची कस,
तुझे ते रेशमी केस,
आणि तुझा तो,
वेड लावणारा फेस,
तुझे ते गोरे गाल,
तुझे ते ओठ लाल,
मनाला फुंकर घाल.
Tuesday, October 12, 2021
साथ देशील का..
जीव लावते तुझ्यावर सख्या,
साथ मला देशील का,
आपली म्हणून मला,.
घट्ट मिठीत घेशील का,
पडले मी एकटी जरी,
हात माझा धरशील का,
जगाने सोडली साथ जरी,
तू मज साथ देशील का,
एकटी पडले रे आयुष्यात,
एकटे पण दूर करशील का,
या जीवनी सख्या,
मला तू साथ देशील का,
धुंद अशा राती ला,
स्वप्नात सख्या येशील का,
तुझ्या मायेच्या त्या,
घट्ट मिठीत घेशील का,
सोडूनी सर्व येईन तुझ्याकडे,
मला सख्या सावर शील का,
त्या प्रेम सुखाच्या दुनियेत,
माझ्या सवे रमून जाशील का.
भेटायचं आहे...
सखे एकदा तुला भेटायचं आहे,
मन भरून पहायचं आहे,
तुझ्याशी मन भरून बोलायचे आहे,
तुझा हात हाती घ्याचा आहे,
तुला घट्ट मिठीत घ्यायच आहे,
तुझ्यात हरवून जायचं आहे,
तुझे ते गुलाबी गाल,
ओढून पाहायचे आहेत,
तुझी ओठची लाली,
टिपून घ्यायची आहे,
तुझा कंबरेचा बांधा,
घट्ट धरायचा आहे,
कोमल पाठीवर ,
हात फिरवायचा आहे,
तुझ्या सवे पावसात,
चिंब भिजायचं आहे,
तुझ्या रेशमी केसाच्या छायेत,
लपून जायचं आहे,
खरच तुला एकदा भेटायचे आहे,
मिठीत घ्ययच आहे,
तुझ्या त्या मिठीत,
विरून जायचं आहे
Thursday, October 7, 2021
चेहरा....
चेहरा...खरच चेहऱ्यात काय असते का हो..
ते तुमच्या मनावर असते ,काय असते का नसते हे बघायची.कधी..कोणाचे चेहरे खूप छान असतात..पण ते खरच मनाने आतून छान असतात का.? ते ग्रेट असतात जे चेहऱ्यावर प्रेम करत नाहीत...पण चेहरा पण महत्वाचा असतो.
मी एका psaykologist चा शिष्य आहे..manshastr चा अभ्यास...वगेरे..आणि लेखक असल्या मुले..सगळा अभ्यास करावा लागतो.लोक खोटी कशी असतात..कशी होतात.
मन कुठे कसं आणि का विचलित होत...अस सर्व बघायचं होतं.
आता माझच सांगतो...मी तोच आहे..तसाच जो दिसतो आहे..पण कधी कधी मला खोटं रूप घ्यावे लागते..ते ही खोट्या लोकांसाठीच..
आणि कोणी अशी कोणाच्या चेहऱ्याची टिंगल,चेष्टा मुळीच करू नये..आणि चेहरा किती दिवसाचा असतो हो...झालं 40 गेलं की सुरकुत्या पडतात.....म्हणून..मन चांगले ठेवा.आणि मनाने सुंदर बना..आणि ही ही गोष्ट आहे..तुमचा frd,bf,किती सुंदर handsome असतो पण तो तुमची किंमत करत नाही,दारू,वाईट गोष्टी करतो.असा असतो तो.मग फक्त तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर भाळले असता...धन्यवाद
Wednesday, October 6, 2021
सांजवेळी...
येशील का भेटाया तू,
अशा सांजवेळी,
धुके हे वीरता ना,
येशील का घट्ट मिठीत,
गार गार वारे वाहतात,
हरवून जाऊ दोघे ही,
एकाच स्पंदनात,
झालेली भेट राहील मनात,
त्या चिंब पावसात भिजून जाऊ,
एकमेका लीप टून घेऊ,
प्रीती चे गीत गाऊ,
येशील का सांजवेळी,
किती सखे वाट पाहू.
लचके कधी थांबणार..
नमस्कार... आज जरा वेगळ्या आणि गंभीर विषयावर लेख लिहित आहे,हो विषय महत्वाचं आणि गंभीर आहे, लचके कधी थांबणार.
आपण बघतोय देशात, राज्यात अशा अनेक घटना घडत आहेत . मुलींवर स्त्रियांवर बलात्कार होतात आणि नंतर त्यांना क्रूरतेने मारून टाकले जाते.अशा नराधम चा मी निषेध करतो.
किती लाजस्पद गोष्ट आहे,आपला देश,आपलाच राज्य आणि आपल्याच देशात राज्यात अशा घटना घडव्यात,नक्की चुकत कुठ,ती करणारी पोर पण आपलीच असतात,मुलगी ही आपल्याच पैकी असते कोणीतरी ,का अजून हि आमच्या आई बहिणी सुरक्षित नाहीत? त्या मुलांमधे ही वाईट भावना येते कुटून आणि कशी?
सगळा खेळ मानसिकतेचा आहे आणि आत्मपरीक्षण चा. लहान पनी आम्हाला शाळेत सांगितले जाते,भारत माझा देश आहे,सारे भारतीय माझे बांधव आहेत, विसरता कसे हे...
आणि इथे ही स्वार्थ आहे हा काही लोकांचा मुलांचा की माझी बहिण फक्त सेफ चांगली राहिली पाहिजे,मग बाकी काही होऊ दे..अशी मानसिकता ठेवणारे पण असतात..so का ठेवतात ते अशी मानसिकता.तुमचा मुलगा जर बिगडत चाललाय तर त्याचा नीट इलाज करा,उगाच मुली तिच्या मुलाला नीट करायच्या मशीन नाहीत.
हे अशे अपराधी कुटून तयार होतात..ते काय बाहेर देशातून येतात का? नाही ते इथलेच असतात ,कोणाचे तरी मुलगे,कोणाचे भाऊ,असे
मग का ढासळते यांची मानसिकता...
प्रत्येक पाल्याने ही काळजी कीव शिकवण दिली पाहिजे की आपला मुलगा 1 वेळेस भिक मागेल पण तसले मुलीवर अत्याचार करणार नाही कधी.
ही काळजी पालकांनी घेतली पाहिजे.
आणि जी मुलं आज मी हा किंग ,मी अमुक राजा,अमुक भक्त,अशी नावे लावतात त्यांना समजले पाहिजे की स्वतःच्या बहिणीची जशी काळजी घेता तशी इतर ही मुलींची काळजी आणि राक्षन करा.तुम्ही कोणत्या ही मुलीच्या मागे तशा संकट काळी उभे राहिलात ना,तेव्हाच तुम्ही खरे किंग असणार आहात.
आणि मुली बिचाऱ्या काय करणार तशा वेळेस, बळ अपुरे ,टाकत अपुरी कोण मदतीला नाही.
म्हणून अशा घटना टाळण्यासाठी जनता लोक आणि चांगले न्यू जवान मुले यांची खूप गरज असते. हो जनतेचा मोठा सहभाग असावा,
कारण जनता कशी असते हे तुम्हास सांगायला नको.भितात खूप मग मी कसा जवळ जाऊ पोलिस zanjat वगेरे अस बोलून मागे सर तात
आणि आपण बघतो जर कोणाचा acsident झालं तर लोक अशी बघत बसतात mob मधे चत्रिकरण करत मग काय बोलायचं माणसांना
मुलगी जर तशा नराधमांच्या तावडीत असेल आणि तुम्हाला दिसेल तर धडाडीने जा जरी एकटे असला तरीही जा सामना करा शेवटच्या क्षणा पर्यंत...आणि त्या मुलीचं रक्षण करा,देव तुम्हाला नक्की ताकद देईल.आणि तरुण मुलांनी त्याचा
जवानी तरुण पण ताकद वाईट गोष्टी करण्यात वेस्ट घालवण्या पेक्षा आपल्या राज्यातील ,देशातील माय मुलींना अशा घटने पासून वाचवण्यात घालवा.. तरच तुमची जवानी आणि मरदांगी सफल ठरेल.हे झालं जनता आणि असणारी मुले यांनी अशा घटना घडू नये म्हणून झटणे.
आता जरा बघू मुले आणि मुली कुटे चुकतात का.
मी आधीपासूनच सांगतोय की हे प्रेम,लफड,रोमान्स,असल्या गोष्टी पासून दूरच रहा
काही मग यातूनच अशा घटना घडू शकतात.. जस तिने नकार दिला त्याचा राग असू शकतो,पुन्हा दोघांचं ही प्रेम असते पण कुटे तरी काही बिघडते मग भांडणे ,ब्रेकअप वगेरे....
म्हणून मुलींनी ही अशी चूक करता काम नये.
आता बघू आपले सरकार आणि कायदा सुव्यवस्था ,खरच ही सिस्टीम काम करते का हो नीट...हा प्रश्न मला ही पडला आहे..कीव करत ही असेल न्यायकरक काम,पण लेट होत असेल.
हा मान्य करावे लागेल की अशी घटना घडली की आरोपी ला लगेच शिक्षा देता येत नाही,तो प्रोसेस असते.कारण कोणत्याही बे गुण्याला शिक्षा होऊ नये.आणि आरोपी ना ही काही अधिकार आहेत की ते दयेचा अर्ज वगेरे करू शकतात राष्ट्र पती कडे..पण मला सांगा खरच एवढं वेळ लावण घालवन योग्य आहे का हो, त्या निर्भया cya आरोपींना 4 वर्षांनी फाशी मिळते...सांगा देशातील 1 ही नागरिकाला ते पटले नाही,फाशी झाली पण 4 वर्ष नंतर.. कोपरडी प्रकरण पण तसे झाले खूप विलंब लागला...मग चूक कोणाची सिस्टीम कायद्याची की सरकार ची ?
आणि मग हे सर्व योग्य वाटत नसेल तर मग नव्या कड्क कायद्याची गरज आहे का हा ही विचार केला पाहिजे.आणि योग्य कड्क कायदा केला ही पाहिजे. विलंब केला की काय होत त्या पीडित मुलीच्या घरच्या लोकांची स्थिती बघवत नाही हो.
आणि त्या विलंबनात जर त्या आई कीव वडिलांचं मृत्यू झाला तर...मग त्यांच्या ही आत्म्याला शांती नसणार आणि पीडित मुलीच्या ही...
आणि मुलींनी ही आता अजिबात कच्च रहायचं नाही...सोबत काही तरी बळगलेच पाहिजे हो...
तो येतोय ना तुम्हाला संपवायला इज्जत लुटायला मग कसलाही विचार करू नका सरळ चीत करून टाका...पुढचे पुढे...त्याला संपवून टाका...हो असच सांगेल . कारण जर तुम्ही त्याला रोकले नाही संपवले नाही तर तो मग असे दिल्ली,कोपर्डी सारखे अपराध करत राहील.
आणि मुलांनी ही आपली जवानी ताकद दाखवायची तीच वेळ असते कचे राहू नका
तुम्हाला जर चाहूल लागली की काही तरी तसे विपरीत होणार आहे ,की लगेच एकत्र या जीवच रान करा आन त्या ताई ला त्यांच्या तावडीतून सोडवा. आता कोणी म्हणेल की ही असली रिस्की काम पोलिस ची असतात त्यांनी केलं तर ते ठीक राहील....अहो ते नाहीत करणार वेळेवर काही,करतील पण ,पण वेळेवर नाही आणि ती निर्भया त्या अवस्थेत बस मधे आकांताने किंचाळत होती तेव्हा कुटे होते पोलिस सांगा.
कोपार्डी झालं कुटे होते....म्हणून जनतेने पुढाकार हा घेतलाच पाहिजे.तरच अशा घटना ना आळा घालता येईल...
काही चूक झाल्यास क्षमा असावी..
अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी हा छोटासा
प्रयत्न केला..जाणून घ्या,समजून घ्या.
धन्यवाद.
संशय आणि बरच काही
Hii...frds...आज जरा लेख लोहतोय संशय वर
संशय) हा विषय नाव प्रमाणेच खूप गंभीर आहे.
काही लोक खूप संशयी असतात,तर काहींना संशय घेतला तर खूप राग येतो.
आपल्या वर कोणी संशय घेतला की खूप राग येतो कारण आपण तसे नसतो,आणि तशी गोष्ट केलेली नसते,मग अस का होत.आणि वैवाहिक जीवनात तर या गोष्टी खूप घडतात..so.
संशय ही अशी गोष्ट आहे ती मनातून तयार होते.
कारण एखाद्या व्यक्ती वर आपला खूप जीव असेल प्रेम असेल तर आपणास भीती असते की
ही माझी आहे,दुसऱ्याची तर नाही होणार ना,आणि तीच ,त्याच ,प्रेम कमी नाही होणार ना.
ही व्यक्ती आपल्या पासून दूर नाही जाणार ना..हे अशे प्रश्न सारखे सतावतात.आणि मग यातून संशय ही भावना तयार होते.मग ते कोणते ही जीवन असो,मैत्री चे ,वैवाहिक,इतर..
सर्वच म्हणतात की संशय वाईट आहे...आणि तो घेतला नाही पाहिजे.हो ते ही आहेच....पण
आपण असे वागलो ते की संशय घ्यायलाच जगा ठेवली नाही तर.चांगल होईल ना..
आणि एक गोष्ट ही खरी आहे जो जास्त प्रेम करतो तोच जास्त संशय घेतो.ok पण हे ही खर आहे की खर प्रेम असेल तर संशय याला जगा राहत नाही.
जर आपल्या चालू आयुष्यात जर दोघांमध्ये संशयाचे भूत वावरत असेल तर की करायचं?
नीट ऐका...या भुताला जर पळून लावायचे असेल तर दोघात मनमोकळे पणाने संवाद झाला पाहिजे
अगदी सगळे डाऊट क्लिअर झाले पाहिजेत..चर्चा केली पाहिजे..समजा नवरा बोलत असेल की काय ग तू जास्त फोन वर असते कीव जास्त कोणाशी बोलते...अशा वेळी तुम्ही तिथे सर्व सांगून संवाद साधून राहिले पाहिजे..
काही वेळेला अस ही होत की महिला जॉब करतात दिवसभर तिकडे असतात आणि मग काही वेळेस नवऱ्याची घालमेल होते. So तुम्ही बसले पाहिजे मोकळा वेळ असला की आणि मनमोकळा संवाद साधला पाहिजे की तुमच्या शिवाय न कोणी आहे न कोणी नसणार...शेवट पर्यंत.अस त्यांना रोज सांगत जा.आणि त्या प्रमाणे वागत ही जा.डाऊट क्लिअर झाले की संशय पळून जातो हे लक्षात ठेवा.
आता काही लोक अपवाद असतात..की सगळे संशय खरे ठरतात आणि त्या गोष्टी सगळ्या तशाच असतात..या वर आपण काय करणार.
आणि जर चुकून जर तशी चूक तुमच्या कडून झालीच असेल तर मनातून माफी मागा.आणि ते तिथेच stop करा.हो मग माफी..कारण तो,ती तुमचे जीवन साथी असतात..जीवन भराचे..माफ ही करू शकतात...कारण खूप प्रेम असते.
एक उदाहरण सांगावे वाटते...नीट ऐका आणि यातून बोध घ्या.
एक विवाहित जोडपे..लग्नाला 5 वर्ष झाली होती
सगळ चांगल चालले होते,1 मुल झाले.
नवऱ्याच खूप प्रेम होत.आणि तीच ही...
पण आजू बाजूचे लोक असे काही वागतात की या दोघां मधे जरा संशयाचे भूत तयार होते.नवरा सतत बोलत असे की,तू का त्याच्याशी बोली,तू का हसली,तुझ मला नाही पटत..अस वगेरे..
आणि ती बायको ही त्याला रोज सांगत की नाही ओ अस काही तुम्ही उगाच नका ताप देऊ plz.
अस आता रोजच चालू होत..आणि जरा भांडणे ही होऊ लागली..याचा रोज संशय,आणि ती रोज सांगायची..अहो नाही अस काही....
एक दिवस खूप भांडणे झाली आणि तो कामाला गेला ,हिला आता खूप मनस्ताप झाला होता.ती वैतागली होती.आपला जीवन साथी जर समजून घेत नसेल तर की फायदा अशा संसाराचा..
तिने पोरांना व देवाला हात जोडले.आणि आपल्या साडीचा फास तयार केला आणि फॅन ला लावला आणि उडी घेतली अगदी कायम ची..
हा चार वाजता घरी आला . सर्व बघून खूप थक्क झाला खूप रडू लागला...त्याला पाचाताप झाला.
आणि आता पोरगा आणि तो पोरका झाला.
या वरून काय कळते हो? म्हणून मी सांगतोय..
आता हे बोलले नाही पाहिजे अस एवढं dip पण 1 लेखक म्हणून बोलावे वाटते..अशा गोष्टी जर संसारात घडत असतील तर तुमचा जो प्रेम करायचा ,रोमान्स करायचं वेळ असतो किंवा मूड असतो तेव्हा अशा सगळ्या गोष्टी मनमोकळे पणाने बोला सांगा...की तुम्हाला जे वाटते ts अजिबात नाही...ते त्यांना पटवून द्या. अस केलं तरच अशा गोष्टींना आळा बसेल.आणि संसार सुखाचा होईल..
आणि मन मारणे पण शिकले पाहिजे,ते ही खूप गरजेचे आहे,मन मारणे म्हंजे काय आता तर
काही वेळेस अस होत की मुल मोठी होऊ लागतात...आणि मग प्रेम रोमान्स थोड कमी होवून जाते किंवा वेळ आणि जगा भेटत नाही.
आणि अस ही की mr च age प्रमाणे ते आता हवा tsa इच्छा पूर्ण नाही करत तर असूद्या..जे असेल tas चालून घ्या मन मारा..ते सुख दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्नही करू नका.
आणि जवणीत तुम्ही नवीन असताना ते सुख भरपूर घेतले असते...म्हणून वेळ पडली तर मन मारा ....मग संशयाला जगा रहात नाही.
धन्यवाद..
काही चूक झाल्यास मुलगा म्हणून माप करा.
कारण मी लेखणी तून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत आहे....
सुरुवात...
चूक कुणाची ही असो,
मी तरस्तोय बोलायला,
विचार कर ना सखे,
करूया सुरुवात प्रेमाला
Tuesday, October 5, 2021
सांजवेळी
अशा सांजवेळी सोबतीला,
तू माझ्या येशील का,
हसून जराशी गोड,
मिठीत मजला घेशील का.
पाऊस आला की...
पाऊस आला की मन,
खुश होवून जातं,
पाऊस आला की त्या,
थंड सरित गार वाटतं,
पाऊस आला की कसं छान वाटतं,
त्या ढगांच्या छायेत लुप्त होऊ वाटतं,
पाऊस आला की,
मनी काहूर दाटते,
भिजून ही अंग पावसात अंग पेटते,
पाऊस आला की होतो,
फुलांचा वर्षाव,
तसा असतो सरींचा वर्षाव,
पाऊस आला की,
मन बहरून जाते,
चिंब पावसात न्हाऊन जाते.
मिस करतोय
कुठ आहेस ग..
घोर लागतोय मनाला..
खरच मनापासून..
मिस करतोय तुला..
रातीस या....
आठवण तुझी येते,
मला उगीच छळते,
रातीस या एकाकी
स्वप्नामध्ये येऊन भेटते🌹
Monday, October 4, 2021
तू निरागस
तुझे निरागस सुंदर डोळे,
तुझे ते रेशमी केस,
तुला पाहताना होते,
माझीच रस्सी खेच.
Sunday, October 3, 2021
मन गुंतले..
मन गुंतून जाते ग,
मनाचा ठाव मला ही लागत नाही,
प्रेम करतो तुझ्यावर पण,
तुला ते समजत नाही
अशा सांजवेळी हात तुझा,
हातात घट्ट असावा,
तुझ्या कंबरेचा नाजूक बांधा,
वेड लावतो जीवाला
वेदना
नमस्कार...मित्रांनो, आज लेख लिहत आहे..वेदना..आता मी वेदणे वर काय बोलणार,वेदना ही अशी गोष्ट आहे की बल्ब चा काचे सारखी.जरा हात लागला,जरा चुकून धक्का लागला की बल्ब लगेच फुटतो.तशीच वेदना आहे.
आणि वेदना ही अनेक प्रकारची आहे बर...असते.
आपल्याला जखम झाली की वेदना होते.
खूप दुःख झाले की वेदना होते,कोणी,बोलून ,रागावून वेड वाकड बोलले की वेदना होते. माझं म्हणणे असे आहे की मित्रांनो या वेदनेचा तुम्ही नीट अभ्यास करा..मित्रांनो,खरी वेदना कधी होते माहितेय...जेव्हा आपल्याला आपली जवळची खास व्यक्ती धोका देते,किंवा अस काही बोलून जाते,त्याने आपल्या मनाला खूप वेदना होतात...
म्हणून...plz सत्तः मनाशी पक्के करा ,ठाम करा..की मी कोणाला वेदना देणार नाही.
माझ्या मुले कोणाला वेदना होणार नाहीत
अस खरच करून बघा,तुम्हाला कोणीच वेदना देणार नाही.....धन्यवाद.
Saturday, October 2, 2021
ती माझी तशीच आहे.
हो ती माझी तशीच आहे..
त्या नाजुक गुलाबसारखी आहे..
म्हणूनच माझी ती तशीच आहे..
मैत्री ही ती निभावत आहे..
घर संसार ही चालवत आहे..
माझी ती तशीच आहे..
वाऱ्या सारखी येते...
न चुकता लाईक कमेंट करून जाते..
ती खूप ग्रेट आहे..
माझी ती तशीच आहे..
सर्व सावरते...
सगळ समजून सांगते..
निर्मळ मनाची आहे..
माझी ती तशीच आहे..
मला तिचा अभिमान आहे..
की ती माझी दोस्त आहे..
ती खूप नाजूक आहे..
हो..माझी ती तशीच आहे...
अंधार व्यसनाचा
अंधार व्यसनाचा...ही कथा एका विवाहित 35 वर्षीय तरुणाची आहे...मासाच्या आयुष्यात व्यसन हे किती घातक असते,आणि त्या मुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
व्यसन हे आयुष्याचा अंधार करून जाते.आणि हा अंधार एवढा भयानक असतो की पुन्हा उजेड होण्याची शक्यता फार कमी असते..दारू मुले जे नुकसान होत त्याचा पाचातप हा होतोच आणि भोगावाच लागतो..आणि तुमच्या वाईट कर्मा मुळे , वाईट व्यासना मुले तुमच्यावर जे भोग येतात...त्या मधे कोणीच साथ देत नाही.
* अंधार...व्यसनाचा..*
मीना बाहेर ओट्यावर भांडी घासत होती.
दोन्ही मुले शाळेत गेली होती.मोठी मुलगी गौरी,आणि लहान मुलगा गणू. गौरी ५वी मधे तर गणू ३ री मधे होता...
मीना बाहेर भांडी घासत होती,तेवढ्यात तिचा नवरा नाऱ्या खूप दारू पिऊन आला..व तो मीना ला नको त्या शिव्या देऊ लागला..
नाऱ्या= ये...मिने..ते कालच भांगलनी च पैका कुट हाय.. सांग लवकर..
मीना= अहो , तुम्ही आज पण पिऊन आला,किती यला सांगितलं...पिऊ नका,घरात लक्ष द्या लहान पोरं हायती आपली..पैका बैका काय न्हाय...
( नारू आणि मीना मधे जोरदार वाद होतो.आणि नारू मीना ला मारझोड करून पैसे घेऊन जातो.
व दोन्ही मुले शाळेतून घरी येतात.)
मुलगी गौरी= आय...आय..मला बाई नी नवीन धडा शिकवला...आय..तू रडती का ग? काय झालं..हाताला लागले का तूझ्या?...आय..बोल की ग..का रडती.
गणू= आय...तू का रडती ग...काय झालं रडू नको...मला पण रडू येतं..
मीना= आर...पोरांनो....काय न्हाय झालं... माझं डोकं लय दुखतय...म्हण..पाणी येतंय डोळ्यातून.
तुम्ही जेऊन घ्या...
( रात्री पुन्हा नाऱ्या...घरी येतो..व जेवण करून..शिवीगाळ करून झोपण्यास जातो)
मीना= अहो.. काल पसन माझ्या छातीत अन् पोटात दुखतय...उद्या जाऊया सरकारी दवाखान्यात...लय तरास व्हतूया..
नाऱ्या= ये...गप पड.पोटात दुखतय..न्हाई लगीच मरत...
( त्या रात्री मीनाला खूप त्रास झाला, पण तिने तो अंगावर काढला..उद्या दवाखान्यात जायचं या आशेवर.)
( दुसऱ्या दिवशी मुले शाळेत जातात.अन् मीना नाऱ्या ला चला दवाखान्यात जायचं असे सांगते)
मीना= अहो..चला की लय तरास होतय..
नाऱ्या= ये...दवाखाना नंतर...मला 100 रू दे आदी...दे लवकर न्हाय तर कानसुल फुडीन.
मीना= आव अस का करतात ...मी ते पैस पोरांच्या शाळ साठी अन् मला दवाखाना साठी ठेवल्यात...म्या न्हाई देणार..
( नाऱ्या पुन्हा जाऊ दवाखान्यात पण मला आता पैसे दे अस सांगत मीना ला शिवीगाळ करतो.आणि पैसे घेऊन बाहेर जातो.)
( मीना चा जीव मुलांसाठी खूप तुटत असतो.नशिबी नवरा असला,मला ही बिमारी,मुलांचं कसं होणार..या चिंतेत ती असायची)
( रात्री नाऱ्या पुन्हा पिऊन घरी येतो.)
मीना= आव..काय म्हणायचं तुम्हाला..सगळ्या पशाची दारू पिऊन आला..मला लय तरास होतय...मला काय बी करून उद्या दवाखान्यात न्या...
नाऱ्या= य बाई...झोप तू उद्या बघायला इल...मरत न्हैस लगिच..पैस संपल्याती...म्या समद उडवल...झोप गप.
( दोघा मधे पुन्हा वाद मारझोड होते.मुल घाबरतात)
गौरी मुलगी= बाबा आय ला का मारताय...मारू नका...( रडू लागते)
गणू= बाबा मारू नका आई ला...( जोराने रडत आई पाशी जाऊन तिच्या मांडीवर झोपतो)
( मीना ही सर्व यातना,लागलेला मार सहन करून झोपी जाते.)
दुसऱ्या( दिवशी सकाळी)
दोन्ही( मुले शाळेत जातात..आणि नारू आता नीट शुध्दीवर असतो..तो गावातील लोकांकडे पैसे मागायला जातो..तसा तो जे काम करेल तो पैसा तो दारू जुगार मधे उडवायचा..आणि आता तो लोकांकडे उदार पैसे मागण्यासाठी जातो..)
हिकडं( घरात मीना वेदनेने व्याकूळ..आपल्या मुलांची अन् नवऱ्याची वाट बघत बसते.)
( मुले शाळेतून घरी येताना त्यांचा संवाद)
गणू= ये...दिदे...बाबा आई ला रोज का मरतो ग..
आई लय रडती...मला बी लय रडायला येत मग...
( गणू रडू लागतो)
गौरी= गणू रडू नको,न्हाई मारत बाबा...ही समद दारू मूळ होतय...तू रडू नको...चल लवकर घरी...आपल्याला..आई ला दवाखान्यात न्याच हाय...बाबा न्हेत नाय ना आई ला दवाखान्यात चल आपण न्हेऊ तिला.
( दोन्ही मुले घरा पाशी पोचतात..घराचा दरवाजा अलगद उघडतात...)
( सगळ दृश्य पाहून गौरी जोराने किंचालते, हंबरडा फोडते..)
( ते दृश्य होत...मीना चीली पाशी...नीचीप पडलेली असते...अगदी कायमची...( Deth)
( काही वेळाने नारू हताश चेऱ्याने घरी येतो..त्याला पैसे कोणीच दिले न्हवते...त्याला ही काही सुचत नव्हते आणि तो घरी येतो...आणि त्याला...एक दृश्य दिसते...)
( मीना शांत चुली पाशी पडलेली...आणि ती दोन्ही मुलं...आकांताने...किंचाळत..हंबरडा फोडत...आई पाशी...बसलेली असतात.)
नाऱ्या ला आता कळून चुकले आपण खूप मोठी चूक केली...आपल्या व्यासणा मुळ आपल्या जीवनाचा ,आपल्या संसाराचा अंधार झाला.
तो ही डोके आपटून रडू लागतो...त्याला पाचातप होतो... . समाप्त.
धन्यवाद..
टिपः... सदर कथा काल्पनिक असून असणाऱ्या पात्रा शी,घटने शी,नावाशी,कोणाचा काही संबंध नाही...असल्यास योगायोग समजावा..
वेळ काढतो
कामाची यादी करून पाहतो,
काही उद्यावर ढकलतो,
तुझ्याशी खूप बोलायचं आहे,
अवरजून सखे वेळ काढतो
निर्मळ प्रेम...
प्रेम करेन अखंड निर्मळ,
हे माझं वचन आहे,
साथ देईन तुझी शेवट पर्यंत,
काय तुझी परवानगी आहे,
Subscribe to:
Posts (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...